BK Maha Media

मूल्यनिष्ठ पत्रकारितेसाठी समर्पित संकेतस्थळ

नागपूर येथे राज्यस्तरीय अभियानाचा भव्य शुभारंभ


✍🏻 प्रेस नोट : मराठी

नागपूर येथे राज्यस्तरीय अभियानाचा भव्य शुभारंभ
“एकता आणि विश्वासातून महाराष्ट्राचे सुवर्णयुग” अभियानाचे आयोजन

नागपूर : महाराष्ट्रात सामाजिक एकता, परस्पर विश्वास आणि सकारात्मक मूल्ये अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने ब्रह्माकुमारीज संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय अभियान “एकता आणि विश्वासातून महाराष्ट्राचे सुवर्णयुग” याचा भव्य शुभारंभ करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम बुधवार, दि. २५ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता नागपूर येथील ब्रह्माकुमारीज विश्व शांती सरोवर, जामठा येथे आयोजित करण्यात आला आहे.

माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू प्रमुख अतिथी

या राज्यस्तरीय कार्यक्रमात भारताच्या माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमात समाजाच्या विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती, प्रशासकीय अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षणतज्ज्ञ तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होतील, अशी अपेक्षा आहे.

कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पूर्वनोंदणी

ब्रह्माकुमारीज नागपूर यांच्या वतीने आयोजित या अभियानाचा मुख्य उद्देश समाजात परस्पर विश्वास, बंधुता आणि नैतिक मूल्ये दृढ करणे तसेच महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी जनजागृती निर्माण करणे हा आहे. या कार्यक्रमाद्वारे आध्यात्मिक चेतना, सामाजिक समरसता आणि सकारात्मक विचारसरणीचा प्रसार करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. आयोजकांच्या माहितीनुसार, कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पूर्वनोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे. निर्धारित पाससह वेळेपूर्वी उपस्थित राहावे, ओळखपत्र सोबत ठेवावे तसेच सुरक्षा विषयक नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

‘A to H रोडमॅप’द्वारे महाराष्ट्राच्या सुवर्णयुगाचा संकल्प

“एकता आणि विश्वासातून महाराष्ट्राचे सुवर्णयुग” या संकल्पनेवर आधारित ‘A to H रोडमॅप’ हा अभिनव सामाजिक परिवर्तन उपक्रम ब्रह्माकुमारीज्, नागपूर यांच्या वतीने सादर करण्यात आला आहे. व्यक्तीपरिवर्तनातून कुटुंब आणि समाजपरिवर्तन साध्य करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात येत आहे.

या रोडमॅपमध्ये A ते H पर्यंत आठ महत्त्वपूर्ण मूल्याधिष्ठित संकल्पना मांडण्यात आल्या आहेत.

A – Addiction-Free Society अंतर्गत दारू, अमली पदार्थ व हानिकारक डिजिटल व्यसनांपासून मुक्त समाजाचा संकल्प आहे.
B – Balanced Living मध्ये काम, कुटुंब, आरोग्य आणि अंतर्गत शांतता यांचा समतोल साधण्यावर भर देण्यात आला आहे.
C – Cleanliness & Civic Responsibility द्वारे स्वच्छ सवयी व ‘स्वच्छ महाराष्ट्र’चा संदेश दिला जात आहे.
D – Dharma, Discipline & Cultural Revival या अंतर्गत नैतिकता, परंपरा आणि आत्मशिस्तीचे पुनरुज्जीवन यावर भर आहे.
E – Education with Values मध्ये ज्ञानासोबत चारित्र्य आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे.
F – Fitness, Faith & Yogic Lifestyle योग, ध्यान आणि सकारात्मक विचारसरणीच्या माध्यमातून निरोगी जीवनशैलीचा प्रसार करण्यात येणार आहे.
G – Green & Sustainable Maharashtra पर्यावरण संवर्धन व पर्यावरणपूरक जीवनशैली यावर आधारित आहे.
H – Harmony, Health & Happiness अंतर्मनातील समरसतेतून सामाजिक समरसता निर्माण करण्याचा संदेश देतो.

“जेव्हा व्यक्ती बदलते, तेव्हा कुटुंब बदलते; आणि कुटुंब बदलले की समाज बदलतो,” या संदेशातून या अभियानाचा मूलमंत्र स्पष्ट होतो.

ब्रह्माकुमारीज् संस्थेच्या वतीने विविध शिबिरे, जनजागृती कार्यक्रम, कार्यशाळा आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून हा ‘A to H रोडमॅप’ राज्यभर राबविण्याचा संकल्प करण्यात आला आहे. नागपूर येथून सुरू झालेला हा उपक्रम महाराष्ट्रात नैतिक, आध्यात्मिक व सामाजिक पुनरुत्थानाची नवी दिशा देईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

या ऐतिहासिक राज्यस्तरीय अभियानात सहभागी होऊन महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन ब्रह्माकुमारी रजनीदीदीजी, प्रभारी नागपूर उपक्षेत्र यांनी केले आहे.

ब्रह्माकुमारी रजनीदीदीजी ,
प्रभारी नागपूर उपक्षेत्र
संपर्क : ८२०८३३१६६४, ९८५०१४५६०४

कार्यक्रमाच्या मीडिया वृत्त सेवेसाठी –
https://bkmahamedia.com/nagpur/



—————————————————————————–

✍🏻 प्रेस नोट : हिंदी

नागपुर में राज्यस्तरीय अभियान का भव्य शुभारंभ
“एकता और विश्वास से महाराष्ट्र का स्वर्णिम युग” अभियान का आयोजन

नागपुर : महाराष्ट्र में सामाजिक एकता, आपसी विश्वास और सकारात्मक मूल्यों को सुदृढ़ करने के उद्देश्य से ब्रह्माकुमारीज़ संस्था के तत्वावधान में राज्यस्तरीय अभियान “एकता और विश्वास से महाराष्ट्र का स्वर्णिम युग” का भव्य शुभारंभ किया जा रहा है। यह कार्यक्रम बुधवार, दिनांक 25 फरवरी 2026 को सायं 6 बजे नागपुर स्थित ब्रह्माकुमारीज़ विश्व शांति सरोवर, जामठा में आयोजित किया जाएगा।

माननीय राष्ट्रपति श्रीमती द्रौपदी मुर्मू मुख्य अतिथि

इस राज्यस्तरीय कार्यक्रम में भारत की माननीय राष्ट्रपति श्रीमती द्रौपदी मुर्मू मुख्य अतिथि के रूप में उपस्थित रहेंगी। कार्यक्रम में समाज के विभिन्न क्षेत्रों के गणमान्य व्यक्ति, प्रशासनिक अधिकारी, सामाजिक कार्यकर्ता, शिक्षाविद तथा नागरिक बड़ी संख्या में सहभागी होंगे, ऐसी अपेक्षा है।

कार्यक्रम में सहभागिता हेतु पूर्व पंजीकरण अनिवार्य

ब्रह्माकुमारीज़ नागपुर द्वारा आयोजित इस अभियान का मुख्य उद्देश्य समाज में आपसी विश्वास, भाईचारा और नैतिक मूल्यों को सुदृढ़ करना तथा महाराष्ट्र के सर्वांगीण विकास हेतु जनजागरण करना है। इस कार्यक्रम के माध्यम से आध्यात्मिक चेतना, सामाजिक समरसता और सकारात्मक सोच का प्रसार किया जाएगा। आयोजकों के अनुसार कार्यक्रम में सहभागिता के लिए पूर्व पंजीकरण अनिवार्य है। निर्धारित पास के साथ समय से पूर्व उपस्थित रहें, पहचान पत्र साथ रखें तथा सुरक्षा नियमों का पालन करें, ऐसा अनुरोध किया गया है।

‘A to H रोडमैप’ के माध्यम से महाराष्ट्र के स्वर्णिम युग का संकल्प

“एकता और विश्वास से महाराष्ट्र का स्वर्णिम युग” की संकल्पना पर आधारित ‘A to H रोडमैप’ एक अभिनव सामाजिक परिवर्तन पहल के रूप में ब्रह्माकुमारीज़, नागपुर द्वारा प्रस्तुत किया गया है। इस पहल के माध्यम से व्यक्ति परिवर्तन से परिवार और समाज परिवर्तन का संदेश दिया जा रहा है।

इस रोडमैप में A से H तक आठ महत्वपूर्ण मूल्याधारित संकल्पनाएँ प्रस्तुत की गई हैं—

A – Addiction-Free Society
शराब, नशे तथा हानिकारक डिजिटल व्यसनों से मुक्त समाज का संकल्प।

B – Balanced Living
कार्य, परिवार, स्वास्थ्य और आंतरिक शांति के संतुलन पर बल।

C – Cleanliness & Civic Responsibility
स्वच्छ आदतें और ‘स्वच्छ महाराष्ट्र’ का संदेश।

D – Dharma, Discipline & Cultural Revival
नैतिकता, परंपरा और आत्मअनुशासन का पुनरुत्थान।

E – Education with Values
ज्ञान के साथ चरित्र और सामाजिक उत्तरदायित्व का विकास।

F – Fitness, Faith & Yogic Lifestyle
योग, ध्यान और सकारात्मक सोच द्वारा स्वस्थ जीवनशैली का प्रसार।

G – Green & Sustainable Maharashtra
पर्यावरण संरक्षण और पर्यावरण-अनुकूल जीवनशैली।

H – Harmony, Health & Happiness
आंतरिक समरसता से सामाजिक समरसता का निर्माण।

“जब व्यक्ति बदलता है, तो परिवार बदलता है; और जब परिवार बदलता है, तो समाज बदलता है,” इस संदेश के माध्यम से अभियान का मूल मंत्र स्पष्ट होता है।

ब्रह्माकुमारीज़ संस्था द्वारा विभिन्न शिविरों, जनजागरण कार्यक्रमों, कार्यशालाओं और सामाजिक पहलों के माध्यम से इस ‘A to H रोडमैप’ को पूरे राज्य में लागू करने का संकल्प लिया गया है। नागपुर से प्रारंभ हुआ यह अभियान महाराष्ट्र में नैतिक, आध्यात्मिक और सामाजिक पुनरुत्थान की नई दिशा देगा, ऐसा विश्वास आयोजकों ने व्यक्त किया है।

इस ऐतिहासिक राज्यस्तरीय अभियान में सहभागी होकर महाराष्ट्र के उज्ज्वल भविष्य के निर्माण में योगदान देने का आह्वान ब्रह्माकुमारी रजनी दीदीजी, प्रभारी नागपुर उपक्षेत्र ने किया है।

ब्रह्माकुमारी रजनी दीदीजी
प्रभारी, नागपुर उपक्षेत्र
संपर्क : 8208331664, 9850145604

मीडिया कवरेज हेतु :
https://bkmahamedia.com/nagpur/


——————————————————————-
✍🏻 ✍🏻 Press Note : English

Grand Launch of State-Level Campaign in Nagpur
“Golden Era of Maharashtra through Unity and Trust” Campaign

Nagpur: With the objective of strengthening social unity, mutual trust, and positive values in Maharashtra, a grand launch of the state-level campaign titled “Golden Era of Maharashtra through Unity and Trust” is being organized under the auspices of the Brahma Kumaris organization. The program will be held on Wednesday, 25 February 2026, at 6:00 PM at Brahma Kumaris Vishva Shanti Sarovar, Jamtha, Nagpur.

Hon’ble President Smt. Droupadi Murmu as Chief Guest

The Hon’ble President of India, Smt. Droupadi Murmu, will grace the state-level program as the Chief Guest. Eminent personalities from various sectors of society, administrative officials, social workers, educationists, and a large number of citizens are expected to participate in the event.

Prior Registration Mandatory for Participation

The primary objective of this campaign, organized by Brahma Kumaris Nagpur, is to strengthen mutual trust, brotherhood, and moral values in society, and to create awareness for the holistic development of Maharashtra. Through this event, efforts will be made to promote spiritual awareness, social harmony, and positive thinking. According to the organizers, prior registration is mandatory to attend the program. Participants are requested to arrive before time with a valid pass, carry their identity card, and strictly follow security guidelines.

Vision of Maharashtra’s Golden Era through the ‘A to H Roadmap’

Based on the concept of “Golden Era of Maharashtra through Unity and Trust,” the ‘A to H Roadmap’ has been presented as an innovative social transformation initiative by Brahma Kumaris, Nagpur. This initiative conveys the message that individual transformation leads to family transformation, which in turn leads to social transformation.

The roadmap presents eight key value-based concepts from A to H:

A – Addiction-Free Society
A pledge for a society free from alcohol, drugs, and harmful digital addictions.

B – Balanced Living
Emphasis on balancing work, family, health, and inner peace.

C – Cleanliness & Civic Responsibility
Promotion of clean habits and the message of a ‘Clean Maharashtra.’

D – Dharma, Discipline & Cultural Revival
Revival of ethics, traditions, and self-discipline.

E – Education with Values
Development of character and social responsibility along with knowledge.

F – Fitness, Faith & Yogic Lifestyle
Promotion of a healthy lifestyle through yoga, meditation, and positive thinking.

G – Green & Sustainable Maharashtra
Focus on environmental conservation and eco-friendly living.

H – Harmony, Health & Happiness
Creating social harmony through inner harmony.

The core message of the campaign is clearly expressed in the statement:
“When an individual transforms, families transform; and when families transform, society transforms.”

Through various camps, awareness programs, workshops, and social initiatives, Brahma Kumaris has resolved to implement this ‘A to H Roadmap’ across the state. The organizers expressed confidence that this campaign, beginning from Nagpur, will provide a new direction for moral, spiritual, and social rejuvenation in Maharashtra.

Brahma Kumari Rajni Didi Ji, In-charge of Nagpur Sub-Zone, has appealed to citizens to participate in this historic state-level campaign and contribute towards building a bright future for Maharashtra.

Brahma Kumari Rajni Didi Ji
In-charge, Nagpur Sub-Zone
Contact: 8208331664, 9850145604

For Media Coverage:
https://bkmahamedia.com/nagpur/

Tags

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

About Author

ब्रह्माकुमारीज् महाराष्ट्र मीडिया सेवा

वाचकांना ताज्या बातम्या, प्रेरणादायी लेख, साहित्य मिळावेत यासाठी नियमित अपडेट होणारे ब्रह्माकुमारीज् चे प्रथम संकेतस्थळ.

आपणास एक परिपूर्ण मराठी संकेतस्थळ अर्पित करीत आहोत. ज्यात  मराठी भाषेतील उत्कृष्ठ साहित्याबरोबर महाराष्ट्रातील ब्रह्माकुमारीज् विद्यालयामार्फत केल्या जाणा­या सेवांची सचित्र माहिती देण्यात येईल.  आपले साहित्य / लेख / कविता / प्रतिक्रीया ईमेल वर पाठवाव्यात. उत्कृष्ठ साहित्य प्रकाशित केले जाईल. 

Follow Us On Social Media